• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : “….तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये!”, निवडणूक आयोगासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : “….तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये!”, निवडणूक आयोगासोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 15 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची काल आणि आज (14 व 15 ऑक्टोबर) रोजी भेट घेतली. यानंतर विरोधातील सर्व पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ठ केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –

दोन्ही निवडणूक आयुक्तांकडे आमचे म्हणणे मांडले असून केंद्रीय आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्थआनिक स्वराज्य संस्था हा राज्य निवडणूक आयोगाचा विषय असल्याचे सांगितले. तर, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी हा केंद्राचे विषय असल्याचे सांगितले. नेमके याचा बाप कोण आहे आणि याला जबबादर कोण आहे? कोणाचा कोणाला पत्ता नाही. निवडणूका घ्यायच्या म्हणून घेत आहेत आणि ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस आहे. दरम्यान, याबाबत आता त्यांना काय शिक्षा देणार? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“….तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये!” –

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्याशी चर्चा सुरु असताना त्यांनी कालच निवडणुका जाहीर केल्या. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ सुधारत नाहीत, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये. तसेच त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यांनी दाखवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

मात्र, सर्वोच्च न्यायालय असे कधीही सांगत नाही की, तुमच्यात काहीही दोष असतील तरी चालतील पण ठरलेल्या तारखेआधीच निवडणुका घ्या. निवडणुका सदोष असू नयेत आणि त्या पारदर्शक पद्धतीने व्हायल्या हव्यात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, यावर दोन्ही आयुक्तांनी सकारात्मक विचार करतो, असे सांगितले. मात्र, आता सकारात्मक विचार करून चालणार नाही, आता अशा गोष्टी होता कामा नये.

निवडणूक निःष्पक्षपातीपणे झाली पाहिजे –

विधानसभा निवडणुकीत सत्ता चोरणाऱ्यांच्या चोरवाटा आता आम्ही अडवल्या आहेत.  निवडणूक निःष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, अशा शब्दांत त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मतदार याद्यांमधील घोळ पुराव्यासह दाखवत निवडणूक आयोगाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उठवले आहे. याप्रसंगी जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, अरविंद सावंत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते तसेच मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या 15 दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: election commissionmarathi newsShivsena UBTsuvarna khandesh liveuddhav thackerayvoter list

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page