मुंबई, 26 जून : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे तसेच रूग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजप कामगार मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्र्यांना निवेदन –
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, भाजप कामगार मोर्चाचे रावेर पुर्वचे सरचिटणीस मिलिंद वाणी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मिळणेबाबत तसेच रूग्णालयीन सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवदेनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी पंकज कोळी, वैभव कोळी, बाबासाहेब झाडे, भुषण महाजन, गोविंद महाजन, संजय महाजन, ईश्वर बडगुजर, किशोर बडगुजर, वैभव, आदी उपस्थित होते.
सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्याची मागणी –
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा येथे मंडळातील सुरक्षा रक्षक कार्यरत असुन त्यांची सेवामागील सन – 2022-23 ते 2024 या कालावधी साठी होती. आता ही सेवासंपुष्टात आलेली आहे, तरी आपणास विनंती आहे. सुरक्षा सेवा विनाखंड सुरु रहाणे करीता मुदतवाढ देण्यात यावी. तसेच रुग्णालयीन अत्यावश्यक सेवे अंतर्गत सुरक्षा सेवा विनाखंड सुरु राहण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्याची मागणी –
जळगाव धुळे व नंदुरबार जिल्हा अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळाकडून जळगाव उप जिल्हा रुग्णालय व ग्रामीण जिल्हा शहरी रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय तसेच नंदुरबार शहरी रुग्णालय / उप. जिल्हा रुग्णालय / शहरी रुग्णालय येथे मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक आपल्याकडे नित्य नियमित सेवा बजावत आहेत. तरी सदर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन हे मागील किमान सात ते आठ महिन्यान पासुन आपल्याकडे थकीत असल्या कारणाने आज रोजी कार्यरत असलेल्यासुरक्षा रक्षकांवर व त्याच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळलेले आहे.
तसेच संबंधित जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडूनमंडळाच्या सुरक्षा रक्षकांची पिळवणूक होत आहे. म्हणजेच एक प्रकारे संबंधितप्रशासनाकडून केलेला हा एक अन्याय आहे. आमच्या कडून सदर मंडळातील सुरक्षा रक्षक बांधवांची ही परिस्थिती व हाल उपेष्टा बघितली जात नाही. दरम्यान, या सुरक्षा रक्षकांचे सर्व थकीत वेतन पुढील दहा दिवसांच्या आत अदा करण्यात यावे, अशी मागणी निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.