• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Raj Thackeray : ‘महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी’

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2024
in महाराष्ट्र
Raj Thackeray : ‘महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी’

नवी मुंबई, 28 जानेवारी : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई वगैरे यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी ही भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर जोरदार फटकेबाजी केली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

मी अनेक वर्षांपासून मराठी या विषयावर मी तुरुंगात गेले. अनेक विषय अंगावर घेतले. मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारच त्याप्रकारचे झालेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसजशी मला कळत गेली, तसतसा मी त्याच्या प्रेमात पडायला लागलो. मला जून महिन्यात अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिकेतर्फे आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याच्या अध्यक्षांनी मला आता सांगितलं की, अमेरिकेत महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत 100 शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा सुरु होत आहेत, हे काय कमी आहे.

मला असे वाटतं की आधी आपण महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे आहे. मला महाराष्ट्रातील शहरातील शहरांमध्ये मराठी सोडून हिंदी कानावर येते, तेव्हा त्रास होतो. भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशी मराठी, गुजराथी, तमिळ, तेलुगू, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशामध्ये राष्ट्रभाषेचा निवाडा झाला नाही. राष्ट्रभाषा म्हणून कोतीही भाषा नेमली गेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संवादासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषा ठेवली. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हे सुरुवातीला बोलल्यावर अनेक लोक माझ्या अंगावर आले. मात्र, तेव्हा मी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचा कागद समोर ठेवला.

आजही गुगलवर गेलात तर कळेल, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटातून आमच्यामध्ये हिंदी आली पण आपण हिंदी का वापरतो, इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरंतर मराठी भाषेमध्ये जो विरोध होतो, तो मला नाही वाटत इतर दुसऱ्या भाषेमध्ये होत असेल. इतकी समृद्ध भाषा, ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याने माझी तळपायाची आग मस्तकात जाते.

माझी दिपकजींना विनंती आहे की, महाराष्ट्रातील मराठी शाळा सोडून सर्व शाळांमध्ये सीबीएसई वगैरे यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी ही भाषा अनिवार्य करावी. मला कळत नाही, ज्याठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील, जिथं तुमची मुलं झाली, त्यामुलांना काय शिकवलं जातंय जर्मन, फ्रेंच. जणू काही ते देश बोलवातच येणार की या रे मुलांनो या. आमची लोकसंख्या वाढवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

जर्मन, फ्रेंच, चायनीज जी शिकायची आहे ते शिका, खूप भाषा शिका. पण जिथं राहात तिथं आधी तिथली मातृभाषा तर शिका. यामध्ये कमीपणा कसला आला. मराठीमध्ये बोलल्यावर कुणी बोलल्यावर तुम्ही म्हणता हे संकुचित आहेत. कशासाठी संकुचितपणा. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल त्यांचा राज्याबद्दल वाटतं, की जगामध्ये सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा पुतळा कुठे बांधावसा वाटतो तर गुजरातमध्ये बांधावसा वाटतो. हिऱ्यांचा वापर त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो, न्यावा त्यांनी. मला असं म्हणायचंय की, देशाच्या पंतप्रधानांना जर स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवतोय, असा सवालही त्यांनी केला.

ही पंतप्रधानावर टीका नाही. जो मूळ आतला माणूस आहे, त्याला आपल्या भाषेवर, राज्यावर प्रेम आहे. तुम्ही का लपवत आहात. ज्या राज्यात मी राहतो, त्या राज्यामध्ये मराठी माणूस घर घ्यायला जातो, त्यावेळी तिकडचा जैन सोसायटीमधील माणूस सांगतो घर मिळणार नाही, काय करायचं आम्ही. तमिळनाडूमध्ये करुन दाखवा, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये, आसाम, आंध्रप्रदेश, केरळमध्ये असे करुन दाखवा. स्थानिक माणसाला पैसे असून घर दिले जात नाही, हे महाराष्ट्रात का होतं. कारण आमचं बोटचेपे धोरण. आम्हीच आधी मागे हटतो. आधी आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: raj thackerayraj thackeray in vishwa marathi sammelan 2024raj thackeray on marathivishwa marathi sammelanvishwa marathi sammelan 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

May 23, 2026
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

May 22, 2026
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

May 22, 2026
सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

May 22, 2026
धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

May 21, 2026
शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

May 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page