• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

जळगाव, 10 ऑगस्ट : महावितरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विद्युत सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना पत्र पाठवून ‘शून्य विद्युत अपघात उद्दिष्टाच्या जनजागृतीसाठी हे अभियान देशासाठी एक आदर्श आहे’, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.

विद्युत सुरक्षेबाबत राज्यभरात जनजागृती करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रकाशमान महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ या विद्युत सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली. मानव संसाधन विभागाचे संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या नियोजनातून दि. 1 ते 6 जून दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत तब्बल 2 लाख 11 हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह महावितरणकडून मोबाईल ‘एसएमएस’द्वारे 1 कोटी 93 लाख आणि ‘ई-मेल’द्वारे 35 लाख 73 हजार वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेबाबत संदेश पाठविण्यात आले.


आजवरच्या सर्वाधिक लोकसहभागाच्या विद्युत सुरक्षा अभियानाची खास दखल घेत केंद्रीय नवीन व नवकरणीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे. ‘महावितरणने शून्य विद्युत अपघाताच्या उद्दिष्टासाठी सुरू केलेल्या जनजागृती अभियानाचे केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाच्या वतीने कौतुक करतो. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने हे अभियान राबवविले आहे. त्यातून प्रत्यक्ष लोकसहभाग व डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्युत सुरक्षेबाबत प्रभावी प्रबोधन व जनजागरण करण्यात आले.

महावितरणचे सर्व संचालक, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी दिलेले योगदान शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची या अभियानामुळे विद्युत सुरक्षेसाठी असलेली बांधिलकी दिसून येते. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होत आहे. महावितरणचे हे विद्युत सुरक्षा अभियान देशातील इतर राज्यांसाठी आदर्श आहे’, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा : “….तर जिल्हाधिकारी अन् एसपी जबाबदार!” वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: electricity safety campaignmahavitaranmarathi newsmos shripad naiksuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

August 10, 2025
“….तर जिल्हाधिकारी अन् एसपी जबाबदार!” वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय म्हणाले?

“….तर जिल्हाधिकारी अन् एसपी जबाबदार!” वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय म्हणाले?

August 10, 2025
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2025
मोठी बातमी! पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सामाविष्ट; 859 कोटींच्या निधीला मंजुरी

मोठी बातमी! पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सामाविष्ट; 859 कोटींच्या निधीला मंजुरी

August 8, 2025
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात पणन मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन 

August 8, 2025
पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

पैसे देण्याची कार्यवाही गतीने करून ठेवीदारांना दिलासा द्यावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

August 8, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page