• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे आमदार किशोर आप्पा पाटील यांची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 24, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे आमदार किशोर आप्पा पाटील यांची मागणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा/मुंबई, 24 सप्टेंबर : मागील दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तसेच भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पुराचे पाणी घरात घुसल्याने संसारपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. यासोबतच गुरे वाहून गेल्याची देखील घटना घडल्या आहेत. दरम्यान, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांची भेट घेत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

आमदारांची उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे मागणी  –

पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काल आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांची भेट घेतली. पाचोरा भडगाव तालुक्यात 16, 22 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे आमदार पाटील यांनी केली.

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान –

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, माझ्या पाचोरा-भडगाव मतदार संघात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झालेला आहे. शेतात शेतक-यांना पीक ही काढायलाही जाता येत नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. मी स्वतः मतदार संघात जाऊन परिस्थितीची पाहणी करून कृषी व महसूल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या पंचनामानुसार दोन्ही तालुक्यात 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीमधील पाण्याचा निचरा होत नसून जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पीक सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेतीचे कोणतेच उत्पन्न येणार नाही असे दिसत आहे.

मागील दोन वर्षापासून दोन्ही तालुक्यांत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, त्यांना अद्यापही त्यांची भरपाई मिळालेली नाही. त्यात आत्ताच्या निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी दि. 11 संप्टेंबर 2019 च्या लागू केलेल्या निकषाप्रमाणे शासनाने मदतीसाठी काढलेल्या जिआर नुसार एनडीआरएफच्या मदतीच्या निकषाप्रमाणे 3 पट मदत दिली होती. त्याचप्रमाणे तशीच मदत माझ्या मतदार संघात मिळावी.

पाचोरा येथे दिनांक 16, सप्टेंबर 2025 (114.8 मिमी) 22 सप्टेंबर 2025 (147.8  मिमी) व 23 सप्टेंबर 2025 (139.3 मिमी) संप्टेंबर 2025 ला पाउस झाला असून तालुक्याचा सरासरी पाऊस 136.4 मिमी असून तो सरासरी पर्जन्यपेक्षा जास्त पेक्षा जास्त 257.8 मिमी पाऊस पाचोरा तालुक्यात झाला. दिनांक २३ संप्टेंबर 2025 पर्यंतचे एकूण पर्जन्याचे प्रमाण 189 टक्के आहे. यांची शासकीय नोंद उपलब्ध आहे.

तसेच भडगाव तालुक्यात दिनांक 23 संप्टेंबर 2025 रोजी पर्जन्याची सरासरी 90.70 मिमी इतकी नोंद झालेली आहे. उक्त पर्जन्याची पर्जन्यमापकानुसार शासकीय नोंद शासनाच्या एकरी उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णयानुसार माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांनाही आपण मदत द्यावी.

अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील खरीपाची पिके पूर्णपणे नष्ट झालेले आहे, त्यासोबत शेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी खचलेल्या असून, शेतातील पाईप लाईन, ठिबक, बांध, फळबागा इत्यादीचे पूर्णताः नष्ट झालेले असून, पक्के डांबरी रस्ते दिसेनासे झालेले आहे. पूल नष्ट होणे, बंधारे वाहून जाणे, दुध दुभती जनावरे बैल, गाय, बकरी, म्हैस, कोंबडी इत्यादी मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे.

तसेच काही शेतकऱ्यांकडील मळणी यंत्रणे, शेतीचे अवजारे, इत्यादी नष्ट झालेले आहे. याव्यतिरिक्त पाचोरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी घरांचे संपूर्ण संसार वाहून गेलेले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. इत्यादी परिस्थितीचा सांख्ल्याने विचार करता पाचोरा-भडगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतक-यांना वरील शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून 3 पट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्राद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा : Video | मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली ऑन फिल्ड पाहणी; पंचनामा ते ओला दुष्काळच्या मागणीवर CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठच सांगितलं

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainmla kishor appa patilpachora floodpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page