मुंबई, 6 मार्च: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून आज 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय कारकीर्दीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होतात, याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवार 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या आदल्यादिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला असून आगामी वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, महायुती सरकारच्या या दुसऱ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेला काय काय मिळणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष्य लाागलंय.
अजित दादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सादर होतोय अर्थसंकल्प –
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. राज्याचा अर्थसंकल्प अवघ्या एक महिन्यावर आला असतानाच अजित दादांचे अकाली निधन झाले. असे असताना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दरम्यान, अजित दादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे.






