बार्शी (सोलापूर), 4 फेब्रुवारी : राज्यात 2024 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्यावतीने शेतकरी कर्जमाफी करण्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर महायुतीत सरकार सध्यास्थितीत सत्तेत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार यावरून सवाल उपस्थित केला जातो. अशातच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठं वक्तव्य केलंय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा पडत आहेत. दरम्यान, आज सोलापुरातील बार्शीत एकनाथ शिंदे यांची जाहीरसभा पार पडली. या जाहीरसभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं.
शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? –
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांना देखील कर्जमाफीचं आम्ही वचननाम्यात आश्वासन दिलंय. यावरून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणारं असं पत्रकार विचारतात. म्हणून, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह आमची एक बैठक झाली. त्यावेळी अजित दादाही होते. तेव्हापासून शेतकरी कर्जमाफीसाठी एक कमिटी गठित करण्यात आली आहे. दरम्यान, या कमिटीचा अहवाल आल्यानंतर, कर्जमाफीसंदर्भाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत. हे सरकार देणारं आहे. असा देखील टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली आहे. या समितीद्वारे कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे. ३० जून २०२६ पर्यंत ही कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता असून, यात शेती कर्जमुक्तीसाठी नवीन निकष ठरवले जातील. दरम्या, समिती आपला अहवाल सादर केल्यानंतर कर्जमाफीची अंतिम व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर






