• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महत्वाची बातमी! 4 थी पर्यंतची शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरणार, पण यामागचे कारण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 9, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
file photo

file photo

मुंबई, 8 फेब्रुवारी : राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. तत्पूर्वी, राज्यपाल रमेश बैस यांनी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केली होती.

राज्य सरकारचा मोठा निर्णय –
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्याची वेळ सकाळी 9 वाजेच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, असे शासन परिपत्रकात म्हटले आहे. हा आदेश 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.

शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा-2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

शासन परिपत्रकात काय म्हटलंय? –
राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळी विशेषतः खाजगी शाळा भरण्याचा वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून आले. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतान दिसून येत आहे.

पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात. तसेच विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होत आहे. सकाळी लवकर उठल्याने बदलत्या वातावरणामुळे देखील विद्यार्थी आजारी पडतात. सकाळी शाळेत जाण्यासाठी लहान मुलांची तयार करण्यासाठी पालकांची ओढाताण होते. यामुळे पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र हा गुन्हेगारीच्या वाटेवर जाताना दिसतोय, चाळीसगावातील गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादीची टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: deepak kesarkarmaharashtra educationmaharashtra schoolsprimary school

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 15, 2025
Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

June 14, 2025
मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

June 14, 2025
पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

June 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page