मधुबनी (बिहार), 24 एप्रिल : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर देखील मोठी कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली असून बिहारमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पहलगाममध्ये हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना कठोर इशारा दिलाय. बिहारमधील मधुबनी येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण पार पडत आहे. या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत