• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

”….म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते,” सांगलीत राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
”….म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते,” सांगलीत राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

सांगली, 5 सप्टेंबर : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मागितलेली माफी ही भ्रष्टाचारासाठी की आरएसएसच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी, असा सवाल उपस्थित करत तुम्ही चुका करतात म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, असा निशाणा त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर लगावला. ते सांगलीत बोलत होते.

सांगलीत राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका –
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघरमध्ये छत्रपती शिवाजी महारांजासह शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली होती. दरम्यान, आज सांगलीत काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा राहुल गांधी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या माफीवरून त्यांच्यावर टीका केली.

माफी मागण्याची कारणं काय? –
राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला गेला. मी वर्तमानपत्रात वाचलं की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली. मी आता समजू इच्छितो की, पंतप्रधान यांनी का माफी मागितली. आरएसएसच्या लोकांना योग्यतेशिवाय कंत्राटे देणे, पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पूज्य महापुरुषाचा अपमान करणे, अशी वेगवेगळी कारणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागण्यामागे असू शकतात.

त्यांनी यांची माफी मागितली पाहिजे –
सर्वात मोठे महापुरूष शिवाजी महाराजांचा पुतळा बनतोय. अन् काही दिवसातच चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याबद्दल किंवा भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळतो. मात्र, पुतळा कोसळण्याचे कारण काहीही असो, पंतप्रधान आणि भाजप हे शिवाजी महाराजांसह संपूर्ण महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत – त्यांनी आपल्या वर्तनाची आणि भ्रष्टाचाराची राज्यातील प्रत्येक नागरिकाची माफी मागितली पाहिजे. दरम्यान, मोठ्यात मोठे कंत्राट हे अदानी-अंबानी यांना दिले जात असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. खेडेगावांचे कंत्राट गुजरातला कसे मिळते, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

पतंगराव कदमांबाबत काय म्हणाले? –
राहुल गांधी पुढे म्हणाले की, नफरत की राजनीती नको असून आम्हाला भाईचारा पाहिजे. पतंगराव कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि महाराष्ट्राला दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले तसेच ते काँग्रेस पक्षातसोबत राहिले. इंदिरा गांधी निवडणूक हरल्यानंतरही ते सोबतच राहिले. दरम्यान, पंतगराव यांचा हा पुतळा पुढील 60 ते 70 वर्षानंतरही असाच राहणार, असे राहुल गांधी यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सांगितले.

हेही वाचा : “मी, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो”, पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: rahul gandhi criticsrahul gandhi critics on narendra modirahul gandhi in sanglishivaji maharaj statue collapsingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

April 3, 2026
पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

April 3, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page