निंभोरा (अमळनेर) – जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या स्वरुपात दिला जाणारा 10 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या निमित्ताने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील आणि त्यांच्या टीमच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गावात सुरुयेत ही विकासकामे –
निंभोरा ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्वच्छता आणि ग्रामस्थांच्या आरोग्य राखण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सविधा, सांडपाणी व्यवस्थापन, आवश्यक तेथे शोषखड्डे करण्यात आले आहेत. तसेच डास निर्मूलनासाठी वेळोवेळी फॉगिंग केले जाते. यासोबतच सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, वाढीव पोल, अशा गोष्टींकडे विशेष लक्ष असते. शुद्ध पाण्यासाठी एक भवनच उभारण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी ही प्रयत्न सुरू –
ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील जि. प. शाळा व अंगणवाडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक त्या बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये किचन शेड, संगणक कक्ष, हँडवॉश स्टेशन, प्रत्येक वर्गात पंखे, लाईट, स्वतंत्र टॉयलेट व बाथरूम आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गावात एलईडी दिव्यांचा वापर, सौर पथदिवे, वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचादेखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंच चंद्रकला पाटील यांनी दिली.
तसेच ग्रामस्थांचे आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी दैनंदिन पाणीपुरवठा, वीज व स्वच्छतेवर विशेष लक्ष असते. तसेच शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी सर्व कर्मचारी पदाधिकारी प्रयत्न करतात. सद्यस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे, स्मशानभूमी सुशोभीकरण व ग्रामपंचायतची नवीन वास्तू यावर लक्ष केंद्रित केले असल्याचेही तत्कालीन सरपंच पायल सुनिल पाटील (2021-22) यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती –
ग्रामपंचायतीला जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या निमित्ताने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील आणि त्यांच्या टीमच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी सरपंच चंद्रकला सुरेश पाटील, माजी सरपंच पायल पाटील, उपसरपंच आलेश प्रल्हाद धनगर, सदस्य प्रा. सुनील पाटील, कौमुदी पाटील, कविता बाविस्कर, जितेंद्र वाडेकर, रवींद्र कोळी, विनोद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी इच्छाराम बाविस्कर उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल, अशा पध्दतीने पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरुवात करण्यात आली आहे.
VIDEO : Mla Anil Patil: मंत्रिमंडळातून का वगळलं, अनिल पाटलांनी सांगितलं यामागचं कारण, नागपुरातून विशेष संवाद