नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्याशी संवाद साधला. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी त्यांना वगळण्यात आलं. तर मग यामागचं कारण काय, या अधिवेशनात खान्देशला काय मिळालं, यासोबतच आगामी काळातील मतदारसंघासाठीचे व्हिजन यावर त्यांनी यावेळी भाष्य केले.