• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 18, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

नवी दिल्ली, 18 मे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “परीक्षांचे पेपर वारंवार का फुटत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. तसेच, इतक्या गंभीर घटनांनंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अद्याप पदावरून हटवण्यात आले नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? –

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तब्बल 22 लाख नीट विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून संसदेचाही अपमान केला आहे. संसदीय समितीच्या अहवालात विरोधी पक्षाचे खासदार सहभागी असल्यामुळे तो अहवाल फेटाळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

२०२४ आणि २०२६ मधील नीट पेपरफुटी घटनांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, २०२४ मध्ये पेपरफुटी झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती आणि कोणत्याही मंत्र्याने जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर २०२६ मध्ये पुन्हा पेपरफुटीची घटना घडली. यावेळी परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी शिक्षणमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न  –

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना तीन थेट प्रश्न विचारले आहेत. वारंवार पेपरफुटी का होत आहे, ‘परीक्षा पे चर्चा’वर सरकार मौन का बाळगत आहे आणि सातत्याने अपयशी ठरणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना पदावरून का हटवले जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राहुल गांधींचा मोठा आरोप –

मोदी सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सरकार आधी शांत राहते, नंतर दोषींना संरक्षण देते आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरच हल्ला चढवते, असा दावा त्यांनी केला. तसेच, २०२४ मधील प्रकरणानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना पदावरून हटवून त्यांची दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsNEET paper leakntapm narendra modirahul gandhisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

May 17, 2026
बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

May 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page