मुंबई, 8 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये आपचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. यामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया –
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, मी आधीपासून सांगितलंय की, निवडणूक लढवत असताना उमेदवारांचे आचार-विचार शुद्ध असले पाहिजे. चरित्र निश्कलंक असणे. जीवनात त्याग असणे आणि अपमान पचविण्याची ताकद असायला पाहिजे. असे गुण जर उमेदवारांमध्ये असेल तर आपल्यासाठी काही तरी करू शकतात असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण होता. सातत्याने हे सगळ त्यांना सांगत होतो. मात्र, त्यांच्या लक्षात आले नाही.
दारूचे दुकानं काढायचे आणि दारूचे परमीट द्यायचे हे विचार जेव्हा यांच्या डोक्यात शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले. दारूचे लायसन्स दिल्याने मद्य घोटाळा झाला. जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार असून आजचा मतदार जागरूक झाला आहे. त्यांनी पाहिले की हे सगळा दारूचा विचार करतात, मग सगळं बिघडलं आणि त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. यामुळे जनतेने जो कौल दिला तो बरोबर दिला, असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
दिल्लीत भाजपला 27 वर्षांनंतर विजय –
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय तर भाजपची विजयच्या दिशेने आगेकूच केलीय. आतापर्यंतच्या मतमोजणीतून दिल्लीतील विधानसभेच्या 70 जांगापैकी भाजप 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाने 27 वर्षांनंतर बाजी मारलीय आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत