• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 27, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 27 मार्च: शेतीमालाच्या वाहतुकीसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या वादातून हे रस्ते अडवले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांना थेट पाच वर्षांसाठी सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जाणार आहे.

 काय आहे संपुर्ण बातमी? –

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि शेतीमालाची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही शेतरस्ते अत्यावश्यक मानले जातात. यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि सुसूत्र करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.

‘पाच वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही’ –

नव्या निर्णयानुसार, शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणारे किंवा रस्त्यांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल पाच वर्षांसाठी ब्लॉक केले जाणार आहेत. परिणामी, संबंधित व्यक्तींना या कालावधीत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नोंद थेट सातबारा (७/१२) उताऱ्यावर करण्यात येणार –

राज्यातील पाणंद रस्त्यांना लवकरच स्वतंत्र आणि अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्यातील सर्व अधिकृत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पाणंद रस्त्यांची स्पष्ट नोंद थेट सातबारा (७/१२) उताऱ्यावर करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यांवर होणारे अतिक्रमण रोखण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.

तहसीलदारांच्या माध्यमातून थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई –

गाव नकाशांमध्ये दर्शविलेल्या आणि शासकीय जमिनीवरील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित तहसीलदारांकडून अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसांची नोटीस दिली जाईल. या कालावधीत अतिक्रमण न काढल्यास, शासनाच्या आदेशानुसार तहसीलदारांच्या माध्यमातून थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केले जाणार नाही. पाणंद रस्त्यासाठी जे शेतकरी स्वेच्छेने जमीन देण्यास तयार असतील, त्यांनी ती जमीन नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र किंवा हक्कसोडपत्राद्वारे शासनाकडे हस्तांतरित करणे बंधनकारक राहील. या प्रक्रियेसाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अधिकृत करण्यात आले असून, अशा नोंदणीकृत व्यवहारांची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावरही करण्यात येणार आहे. तसेच, १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, एकदा पाणंद रस्त्यासाठी जमीन दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला ती जमीन परत मागण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही.

हेही वाचा: राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer newsminister chandrashekhar bawankuleobstructing farm roadsshet panand rasteshetrastesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page