• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

नवी दिल्ली, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल 10 मे संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे भारत-पाक युद्धाला विराम मिळाला असून तणावपूर्ण परिस्थिती सध्या निवळत चालली आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू केल्यानंतर पुढची चर्चा ही सोमवारी 12 मे रोजी होणार आहे. दरम्यान, शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय, हे जाणून घेऊयात.

शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? –
“शस्त्रसंधी” (Ceasefire) म्हणजे दोन युद्धरत पक्षांनी, विशेषतः देशांनी किंवा लष्करी गटांनी, एकमेकांवर चालू असलेली शस्त्रसज्ज कारवाई थांबवण्यासाठी केलेला करार होय. अर्थात शस्त्र म्हणजे हत्यारे आणि संधी म्हणजे थांबवणं किंवा विश्रांती. याचाचा अर्थ शस्त्रसंधीद्वारे दोन देशात सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांवर तात्पुरती बंदी आणण्यात येते. मात्र, शस्त्रसंधीचा हा निर्णय तात्पुरता किंवा दीर्घकालीन असू शकतो.

शस्त्रसंधी (Ceasefire) लागल्यानंतर काय होतं? –
शस्त्रसंधी लागू केल्यानंतर सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांमधून तात्पुरती माघार असते. दोन देशातील लढाई थांबवण्यासाठी तात्पुरता निर्णय घेतलेला असतो. यामध्ये राजकीय किंवा कायदेशीर तोडगा निघालेला नसतो, केवळ लढाई थांबवलेली असते. दरम्यान, कोणत्याही वेळी शस्त्रसंधी मोडली जाऊ शकते.

भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी –
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ला करत निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. यानंतर गेल्या 17 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काल सायंकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्यात आली. असे असले तरी ही शस्त्रसंधी लागू केल्यानंतर अवघ्या तीन तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. मात्र, भारताने कठोर इशारा दिल्यानंतर 10 मे रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठेही शस्त्रसंधींचे उल्लंघन झालेले नाहीये.

हेही वाचा : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा अन् भारत-पाक युद्ध थांबलं, आज नेमकं काय घडलं?

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: ceasefireceasefire between india and pakistanmarathi newssuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

    Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

    November 6, 2025
    Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

    Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

    November 6, 2025
    भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

    भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

    November 6, 2025
    प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    November 6, 2025
    Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

    Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

    November 6, 2025
    दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

    दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

    November 6, 2025
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page