• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 27, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ एका वक्तव्यामुळे जळगावच्या जागेचा तिढा संपला; विधानपरिषदेची उमेदवारी भाजपकडे जाणार?

नवी दिल्ली, 27 मे: राज्यात सध्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते आतापर्यंत जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरून जळगावच्या जागाचा तिढा संपल्याचे समजते.

विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत बहुतांश सहमती झाली असून, उर्वरित नाशिक-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जागांवरील तिढाही लवकरच सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत बोलताना नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांवर तिढा कायम असल्याचे सांगितल्याने जळगावच्या जागाचा तिढा संपला असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्यात जवळपास एकमत झाले आहे. मात्र, शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांपैकी किमान एक जागा आम्हाला मिळावी, असा आमचा आग्रह आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याची जागा मागण्यात आली आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवरच चर्चा सुरू असून, तेही लवकरच मार्गी लागतील. दरम्यान, आता काही कठीण राहिलेले नाही. कठीण पेपर संपला असून सोपा पेपर बाकी आहे. टीकमार्क करायचंय अन् टीकामार्क झाल्यावरून विषय संपेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जागावाटपाचा विषयही मुंबईतच मार्गी लावला जाईल’ –

विधानपरिषदेच्या जागावाटपाचा मुद्दा दिल्ली दरबारी सोडवला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. जागावाटपाबाबत दिल्लीत कोणतीही बैठक झालेली नाही. या संदर्भातील बैठक मुंबईतच होणार असून, जागावाटपाचा विषयही मुंबईतच मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरण; ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ संचालक दाम्पत्याला जळगाव पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpcm devendra fadnavismarathi newsncpseat-sharingshivsenasuvarna khandesh livevidhan parishad election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्या १३ जुलैला बैठक;  नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट चर्चा

July 12, 2026
VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page