नवी दिल्ली, 29 मे : राज्यासह देशभरात यंदा उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढता ठरला असताना दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीत 50 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून त्यातच दिल्लीत तापमानाचा पार 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला. नवी दिल्लीत तापमान 50 अंशाच्या पुढे गेले असून दिल्लीतील आजच्या तापमानाची नोंद 52.3 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये तापमानाने 100 वर्षांचा विक्रम मोडलाय.
दिल्लीतील तापमानाने गाठला उंचांक –
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या तापमानात वाढ झाल्याने रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. दिल्लीतील बहुतांश भागात आज पारा 50 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला. दरम्यान, राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात आज सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान त्याठिकाणी नोंदवले गेले. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगावच या परिसरातही नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागतोय.
उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा –
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचा पारा वाढताना दिसून आला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, दिल्लीतही तापमान 52.3 अंशांवर गेले आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. युपीतील काही शहरात आज 46 अंशाच्या वर तापामानाची नोंद झालीय. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना सामना करावा लागतोय.
हेही वाचा : धक्कादायक! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण ठार, काय आहे संपुर्ण बातमी?






