• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘…तेव्हा गारगार वाटायचे’, ईव्हीएमवरुन अजितदादा भडकले, विरोधकांवर साधला जोरदार निशाणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 9, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Deputy Chief Minister Ajit Pawar speaking in the Legislative Assembly.

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला 42. 4 काही मते मिळाली. तर आघाडीला 43 टक्के मते मिळाली. यामध्ये फक्त 0.4 टक्के मतांचा फरक होता. तरी आघाडीला 31 जागा आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या. आम्ही रडत बसलो नाही. जनतेचा कौल होता. पण तेव्हा ईव्हीएम कसे चांगले वाटले. तेव्हा गारगार वाटायचे, ईव्हीएम चांगले वाटायचे आणि आता गारगार वाटतंय का, गरम वाटतंय, ते तुमचं तुम्हीच पाहा, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार –

त्यांची बिनविरोध निवड होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची पोचपावती आहे, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली तेव्हा तुम्ही शिवसेनेत होता. प्रवक्ता म्हणून तुमचे काम आम्ही टीव्हीवर पाहायचो. इतक ठिकाणी ऐकायचो. एक दिवस मीच आपल्याला म्हणालो की, लोकसभेची जागेवर तुम्ही उभे राहा. तुम्ही नाही म्हणाला, पण त्यावेळी मोदी साहेबांची लाट होती. त्या लाटेत मी-मी म्हणणारे सर्व पराभूत झाले. मी तुम्हाला म्हणालो होतो की, जर अपयश आले तर तुम्हाला विधीमंडळात प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी घेऊ आणि तशाप्रकारे जबाबदारी वरच्या सभागृहात निश्चितपणे तुम्ही त्याठिकाणी पार पाडली. ही तुमची त्या विधीमंडळातील सुरुवात होती. त्याठिकाणी तुम्ही चांगले काम केले.

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी तुम्हाला भाजपमुळे अध्यक्षपदाची संधी त्याठिकाणी मिळाली. महायुतीने तुमची निवड केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यावर संपूर्ण भारताचं लक्ष या विधीमंडळावर होतं. तेव्हा विरोधकांनी अध्यक्षांवर तारतम्य सोडून टीका केली. पण तुम्ही तुमचा संयम ठेवला. कायदेशीर ऐतिहासिक निकाल दिला. तुमचा संयम परंपरेला साजेसा होता.

निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतलं म्हणजेच संविधानाबद्दल आदर वाटतो का? आणि जे संविधान हातात घेत नाहीत, त्यांना आदर नाही का? असं नाही. प्रत्येक बाबतीत संविधान दिनाची सुरुवात आणि इतर दाखले हे दिलेले आहेत. परंतु सर्वांना संविधानाबाबत तरतुदी, त्यांनी एकतर नुसतंच हातात घेतलं, शिंदे साहेब मघाशी तर म्हटले की, ते कोरंच होतं. त्यात मला जायचं नाही. परंतु, संविधानाच्या तरतुदी त्यांनी वाचल्या नाहीत, असं माझं मत आहे किंवा वाचून ते त्याचं उल्लंघन करत आहेत, असं म्हणावं लागेल.

संविधानाच्या अनच्छेद 188 मधील तरतुदीनुसार, प्रत्येक सदस्याने निवडून आल्यावर त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा भंग आहे. संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिला आहे. कायद्याने दिला आहे. हा सामान्य जनेतला अधिकार नाही. अनुच्छेद 329 मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला आव्हान द्यायचे असेल तर ते निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करुन ते द्यावे लागते, संविधानातील या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

मारकडवाडीबाबत आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे. मात्र, कारण नसताना बाऊ करणे, एकतर आपल्याला जनतेने जनतेने नाकारलं आहे, मोठ्या प्रमाणात महायुतीला 48 टक्के आणि समोरच्याला 39 टक्के मते आहेत. इतका मोठा फरक असल्यानंतर दारूण पराभव होणार. आमची बाजू खरी आहे. त्यात कोणतीही खोट नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला 42. 4 काही मते मिळाली. तर आघाडीला 43 टक्के मते मिळाली. यामध्ये फक्त 0.4 टक्के मतांचा फरक होता. तरी आघाडीला 31 जागा आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या. आम्ही रडत बसलो नाही. जनतेचा कौल होता. पण तेव्हा ईव्हीएम कसे चांगले वाटले. तेव्हा गारगार वाटायचे, ईव्हीएम चांगले वाटायचे आणि आता गारगार वाटतंय का, गरम वाटतंय, ते तुमचं तुम्हीच पाहा.

संविधान भाग 3 मध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क नमूद आहेत. त्यात भाषण स्वातंत्र्य, इतरही अनेक स्वातंत्र्य आहे. त्यात नमूद केलेले हक्क, शासनावर बंधनकारक आहेत. त्यात कुठेही पुन्हा समांतरपणे निवडणूक घेण्याचा हक्क नाही. संविधानातील त्या-त्या यंत्रणांचे अधिकार, मग ते न्यायालय असो निवडणूक आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत. नाहीतर अराजक माजेल. बाबासाहेबांनी हे सर्व ओळखूनच ही प्रक्रिया करून दिली आहे. तिचा वापर त्याठिकाणी केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – ‘मागची पाच वर्षे संक्रमणाचा काळ…’, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardycm ajit pawarevmevm controversymaharashtra assembly sessionmaharashtra assembly special sessionrahul narwekar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भरत गोगावले यांच्यात बैठक

June 23, 2026
Government of India grants patent for indigenous technology developed to control airborne microorganisms amidst rising air pollution.

वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हवेतील सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकसित स्वदेशी तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट

June 22, 2026
अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

June 22, 2026
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

June 22, 2026
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

June 22, 2026
Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

June 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page