जळगाव, 3 जून : राज्यात यंदा मान्सून हा मे महिन्यातच दाखल झाल्याने आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. मात्र, आता ठिकठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने 10 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान विभागाने दिलाय. तर दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील जून महिन्यात नेमका कसा पाऊस पडणार याबाबतचा अंदाज व्यक्त केलाय.
पंजाबराव डख यांनी काय म्हटलंय? –
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पावसाबाबत मार्गदर्शन करताना सांगितलंय की, आता अचानकपणे पावसात खंड पडणार नसून 7, 8 आणि 9 जून या दिवसांत महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. यानंतर 10, 11, 12 आणि 13 जून या दरम्यान पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे. पण 14 ते 18 जून दरम्यान जून महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी यामध्ये पेरणी केली असेल आणि ते उगवून आले तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे डख म्हणाले.
View this post on Instagram
जळगावचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांच नुकसान झाले. तर दुसरीकडे गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत असून आता दुपारच्या वेळी उन्हाचा चटक बसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, आज आणि उद्या हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.