• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

रायगड, 15 जानेवारी : भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई मधील खारघर येथील नऊ एकर परिसरात वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढविणे, हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमा मालिनी, इस्कॉन मंदिर मुख्य चिकित्सक सूरदास प्रभु उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू आणि खासदार हेमामालिनी यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला भारत देश विलक्षण आणि अद्भुत भूमी असलेला आहे. देश केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूमीचा तुकडा नसून जिवंत संस्कृती आणि जिवंत भूमीचे प्रतीक आहे. आपल्या या संस्कृतीचे सार हे आध्यात्म आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी आधी आध्यात्म स्वीकारले पाहिजे. जगाकडे केवळ भौतिक दृष्टीकोनातून पाहणारे भारताला विविध भाषा आणि प्रांतांचा संग्रह म्हणून पाहतात. जेव्हा कोणी त्यांचा आत्मा या सांस्कृतिक जाणिवेशी जोडतो तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेद्वारे भगवान कृष्णाचे गहन ज्ञान उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांनी इस्कॉनच्या माध्यमातून गीता लोकप्रिय केली, भाष्य प्रकाशित केले आणि लोकांना तिच्या साराशी जोडले. वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी प्रत्येकाने आपापल्या अनोख्या पद्धतीने कृष्णभक्तीचा प्रवाह पुढे नेला आहे. ते पुढे म्हणाले की त्यांच्या जन्मकाळात, भाषांमध्ये आणि पद्धतींमध्ये फरक असूनही, त्यांची समज, विचार आणि जाणीव एक होती आणि या सर्वांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवीन चैतन्य, प्रेरणा दिली. नवी दिशा आणि ऊर्जा दिली.

भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचा पाया ही सेवा आहे, असे नमूद करून नरेंद्र मोदी यांनी अध्यात्मात देवाची सेवा करणे आणि लोकांची सेवा करणे हे एक होते यावर भर दिला. भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते असा श्रीकृष्णाच्या श्लोकाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ सेवेच्या भावनेवर आधारित असल्याचे अधोरेखित केले. इस्कॉन ही एक विशाल संस्था शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासाठी योगदान देत सेवेच्या या भावनेने कार्यरत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कुंभमेळ्यात इस्कॉन महत्त्वपूर्ण सेवा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्याच सेवेच्या भावनेने सरकार सातत्याने नागरिकांच्या कल्याणासाठी काम करीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक घरात शौचालये बांधणे, उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना गॅस कनेक्शन देणे, प्रत्येक घरात नळाला पाणी देणे, प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देणे, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे ही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वयानुसार, आणि प्रत्येक बेघर व्यक्तीला पक्की घरे उपलब्ध करून देणे या सर्व कृती या सेवेच्या भावनेने चालतात. सेवेची ही भावना खरा सामाजिक न्याय मिळवून देते आणि खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

कृष्णा सर्किटच्या माध्यमातून सरकार देशभरातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना जोडत आहे. हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत विस्तारलेले आहे. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेंतर्गत या स्थळांचा विकास करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी कृष्णा सर्किटशी जोडलेल्या या श्रद्धा केंद्रांमध्ये भक्तांना आणण्यासाठी इस्कॉन मदत करू शकते, असे त्यांनी सुचविले. तसेच इस्कॉनला त्यांच्या केंद्रांशी संबंधित सर्व भाविकांना भारतातील अशा किमान पाच ठिकाणी भेट देण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होत आहे. श्री राधा मदनमोहनजी मंदिर संकुलाची रचना आणि संकल्पना अध्यात्म आणि ज्ञानाच्या संपूर्ण परंपरेचे प्रतिबिंबित करते. मंदिरात दिव्यत्वाची विविध रूपे दिसून येतात, जी ‘एको अहं बहु स्यम’ ही कल्पना व्यक्त करते. नवीन पिढीच्या आवडी आणि आकर्षणांना पूर्ण करण्यासाठी येथे रामायण आणि महाभारतावर आधारित संग्रहालय बांधले जात आहे. त्याचप्रमाणे वृंदावनच्या 12 वनांपासून प्रेरित एक बाग विकसित केली जात आहे. हे मंदिर भारताच्या चेतनेला श्रद्धेसह समृद्ध करणारे एक पवित्र केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. समाज जसजसा अधिक आधुनिक होत जातो तसतसा त्याला अधिक करुणा आणि संवेदनशीलतेची आवश्यकता असते. मानवी गुण आणि आपलेपणाची भावना असलेल्या संवेदनशील व्यक्तींचा समाज निर्माण करण्याची गरज आहे. इस्कॉन, त्यांच्या भक्ती वेदांताद्वारे जागतिक संवेदनशीलतेत नवीन जीवन फुंकू शकते आणि जगभरात मानवी मूल्यांचा विस्तार करू शकते, असे सांगून शेवटी पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, इस्कॉनचे सदस्य श्रील प्रभुपाद स्वामींच्या आदर्शांचे पालन करीत राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, गेल्या दशकात देशाने विकास आणि वारसा यामध्ये एकाच वेळी प्रगती पाहिली आहे. इस्कॉनसारख्या संस्थांचे वारशाच्या माध्यमातून विकासाच्या या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळे शतकानुशतके सामाजिक जाणीवेचे केंद्र आहेत आणि गुरुकुलांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्कॉन आपल्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना अध्यात्माला त्यांच्या जीवनाचा भाग बनवण्यास प्रेरित करते. इस्कॉनचे तरुण अभ्यासक त्यांच्या परंपरांचे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात, त्यांचे माहिती नेटवर्क हे इतरांसाठी एक आदर्श आहे. इस्कॉनच्या मार्गदर्शनाखाली, तरुण सेवा आणि समर्पणाच्या भावनेने राष्ट्रीय हितासाठी काम करतील, असा विश्वास आहे. मंदिर संकुलात स्थापन झालेल्या भक्तीवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि भक्तिवेदांत वैदिक शिक्षण महाविद्यालयाचा समाज आणि संपूर्ण देशाला फायदा होईल, असे सांगून पंतप्रधान श्री.मोदी यांनी ‘हील इन इंडिया’ असे आवाहनही केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्य, प्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव, धुळेसह खान्देशातील ‘या’ आयटीआयला मिळाली ही नावे, नामकरणास राज्य सरकारची मान्यता

बातमी शेअर करा !
Share
Tags: iskcon projectkhargharpm narendra modisri sri radha madanmohanji templesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page