मुंबई, 5 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यामध्ये ते वाशिम तसेच ठाण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तब्बल 32,800 कोट्यवधी रूपयांच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. तसेच 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ देखील करण्यात येणार आहे.
पंतप्रधान सकाळी वाशिममध्ये –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सर्वप्रथम वाशिममध्ये सकाळी भेट देणार आहेत. मोदी सकाळी 11.15 ला वाशिम जिल्ह्यातील पोहरादेखील येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. पोहरादेवी येथे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
ठाण्यात मेट्रोचे उद्घाटन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिमनंतर दुपारी 4 वाजता ठाण्यात दाखल होतील. दरम्यान, ठाणे येथे 32,800 कोटींच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 3 टप्पा 1 या प्रकल्पाचे आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. नैना प्रकल्पाच्या टप्पा दोनची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा मिळणार हप्ता –
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम येथे आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत. यामध्ये 9.4 कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7500 हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9 कोटी 25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा: माजी नेमबाजपटू Anjali Bhagwat महिला सुरक्षेवर काय म्हणाल्या?, विशेष मुलाखत