जळगाव, 1 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले असून यामध्ये राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालय कोणती आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
जळगावच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कितवा क्रमांक? –
राज्य सरकारच्यावतीने कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांची सरकारी विभागाच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविली. या मोहिमेचा पहिल्या टप्प्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक पटकावलाय. तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालयांपैकी जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने चोधा क्रमांक मिळवलाय.
महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी –
1. जिल्हाधिकारी, चंद्रपूर | गुण – 84.29
2. जिल्हाधिकारी, कोल्हापूर | गुण – 81.14
3. जिल्हाधिकारी, जळगाव | गुण – 80.86
4. जिल्हाधिकारी, अकोला | गुण – 78.86
5. जिल्हाधिकारी, नांदेड | गुण – 66.86
महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस अधीक्षक –
1. पोलीस अधीक्षक, पालघर | गुण – 90.29
2. पोलीस अधीक्षक, गडचिरोली | गुण – 80.00
3. पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण) | गुण – 80.00
4. पोलीस अधीक्षक, जळगाव | गुण 65.71
5. पोलीस अधीक्षक, सोलापूर | गुण 64.00
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली असून या यादीत एकूण राज्यातील 48 विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.
हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती