बीड, 15 मार्च : बीड जिल्हा अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चर्चेत आला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. बीडमधील एका शिक्षकाने फेसबूक पोस्ट करत आत्महत्या केली असून धनंजय अभिमान नागरगोजे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. आज सकाळी त्याने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान, आत्महत्येचं नेमकं कारण काय हे समजू शकले नसले तरी शिक्षकाने आत्महत्येपुर्वी अनेकांची नावं घेऊन केलेली फेसबूक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिक्षक धनंजय नागरगोजे हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी असून तो केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होता. 2019 मध्ये राज्य सरकारकडून 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालीच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आल्या.
दरम्यान, आज सकाळी धनंजय नागरगोजे या शिक्षकाने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. मात्र, शिक्षकाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचल्याने त्याचा हा मृतदेह पाहून घरच्यांना दुःख आवरले नाही आणि कुटुंबियांचा मोठा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला. (मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूक खात्यावरून जशीच्या तशी..)
फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलंय? – Dhananjay Nagargoje या फेसबूक खात्यावरून जशीच्या तशी
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही
बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .
श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे
,विजय विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
आणि
त्यांचे कार्य करते
उमेश रमेश मुंडे
गोविंद नवनाथ आव्हाड
ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे
या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे .मला हे
हाल हाल करून मरणार आहेत
मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला
पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली
आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे.
तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो.
काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही .
बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही
श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचो नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे
आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे.
सर्वांना माझा शेवटचा राम राम
हेही वाचा: Breaking : दुःखद! चोपड्याचा बीएसएफ जवान चेतन चौधरी मणिपूरमध्ये शहीद