धरणगाव : भारतातील प्रसिद्ध कथाकार बागेश्वर धाम सरकार/महाराज म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण गर्ग महाराज यांच्या पाच दिवस हनुमंत कथेचे आयोजन जळगाव जिल्ह्यात करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत हे आयोजन करण्यात आले आहे.
बागेश्वर धाम, छत्तरपूरचे पीठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज यांच्या हनुमंत कथेचे आयोजन हे स्वयंभू चैतन्य राम ट्रस्ट, तसेच झुरखेडा ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमंत कथेसोबतच 108 कुंडी रुद्रयाग महायज्ञाचे आयोजन पंडित माणिकलाल पांडे (उत्तर प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
कथेच्या प्रारंभी 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान श्री स्वयंभू महादेव मंदिर झुरखेडा येथून कथास्थळपर्यंत कलशयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. उज्वल चौधरी, किरणा चौधरी, स्वप्निल चौधरी आणि आयोजनाची मूळ संकल्पना असणारे संदीप पंजाबराव पाटील न्यांनी दिली.
बागेश्वर धाम सरकार/महाराज म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण गर्ग महाराज हे एक भारतीय कथाकार आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी वडील श्री रामकृपालजी महाराज आणि भक्त आई सरोज यांच्या पोटी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात सर्युपरिया ब्राह्मण कुटुंबात झाला. ते मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गाहा गावातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र धाम सरकारचे पीठाधीश आहेत.
ते एका साध्या कुटुंबातून येतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक लहान भाऊ आणि बहीण आहे. त्यांचे नाव शालिग्राम गर्ग आणि रीता गर्ग आहे. आज संपूर्ण भारतात बागेश्वर धामचा महिमा पसरला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे दर मंगळवार आणि शनिवारी लाखो भाविक या धामला दर्शनासाठी येतात.