मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर आता भाजपमध्ये संघटनेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर याबाबतचे प्रसिद्धीपत्रक शेअर केले.
2022 मध्ये स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद स्थान देण्यात आले नाही. तर रवींद्र चव्हाण यांना संघटनात्मक दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार, अशी चर्चा होती. अखेर आता रवींद्र चव्हाण यांना भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आ. @RaviDadaChavan जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule pic.twitter.com/Ctga2JbIqQ
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024
नवीन जबाबदारी मिळाल्यावर रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
- 2007 मध्ये रविंद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच 2007 मध्येच काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले.
- 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.
- 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.
- 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.
- 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
- 2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- 2024 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकत चौथ्यांदा आमदार बनले.