• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांचे जुने थकीत वीजबील माफ करण्याची मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 15, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

मुंबई, 15 जुलै: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीनंतर महायुती सरकारने आज आणखी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या (HP) कृषीपंपांना मोफत वीज दिल्यानंतर, आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेला ₹४८,००० कोटींचा जुन्या थकीत वीजबिलाचा बोजा पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आयोजित भाजप किसान मोर्चाच्या ‘शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात’ त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी आता पूर्णपणे कोरी झाली आहे.

कृषीपंपांचे जुने थकीत वीजबील माफ करण्याची घोषणा –

मुंबईत भाजप किसान मोर्चाच्या वतीने ‘शेतकरी कृतज्ञता सोहळा’ (सत्कार समारंभ) आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या विविध निर्णयां बद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत ७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांचे जुने थकीत वीजबिल आता पूर्णपणे माफ केले जाणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७.५ HP पर्यंतच्या कृषीपंपांचे जुने थकीत वीजबिल आता पूर्णपणे माफ केले जाईल. जुन्या बिलांमुळे महावितरणकडून होणारी वसुली आणि नवीन कनेक्शन मिळण्यातील अडचणी आता कायमच्या मिटणार आहेत. दरम्यान, ही थकबाकी वीज कंपनी सोसणार नसून, राज्य सरकार आपल्या बजेटमधून महावितरणला ही रक्कम देणार आहे. शेतकऱ्यांच्या मोफत विजेसाठी सरकार दरवर्षी सुमारे ₹२५,००० कोटींची वीज सबसिडी देत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, सौर कृषी वाहिनी (सोलर फिडर) योजनेच्या माध्यमातून सध्या ७६% शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील १००% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

केवळ कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, तर शेती शाश्वत करण्यासाठी सरकार नदीजोड प्रकल्प आणि वॉटर ग्रिडवर काम करत आहे. वैनगंगा-नलगंगा यांसारख्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील पाणीटंचाई कायमची दूर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समोर कोणतीही निवडणूक नसताना आम्ही शेतकरी हिताचे हे मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी व्हावा आणि त्यांची पाटी कोरी होऊन त्यांना नवा इतिहास लिहिता यावा, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

बातमी शेअर करा !
Share
Tags: 7.5 HPagricultural pumps electricity billscm devendra fadnaviselectricity bills waivermarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page