ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडगावच्या विद्यार्थी सेवा समितीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील द्वितीय वर्ष साहित्य शाखेची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उत्तेजनार्थ (तृतीय) तसेच कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी आशिराना फिरोज फकीर, या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ (द्वीतीय) क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. भरत शिरसाठ यांच्या हस्ते ,सन्मानचिन्ह , रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भडगाव येथील नालंदा बुद्धविहार येथे हा कार्यक्रम पार पडला. सदर विद्यार्थीनींना महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री वर्मा-वाघ मॅडम, प्रा. स्वप्निल भोसले तसेच प्रा. डॉ अतुल सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सुयश मिळवल्याबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.