मुंबई, 21 एप्रिल : भारतात सध्या इंडियन प्रिमिअर लिगचा 18 हंगाम सुरू आहे. दरम्यान, या हंगामात काल 20 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात मुंबईने चेन्नईविरोधात दमदार विजय मिळवला. फलंदाजीने केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने तब्बल तीन वर्षांनंतर चेन्नईवर विजय मिळवला.
मुंबईचा दमदार विजय –
वानखेडे स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर तसेच दीपक चाहर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर तसेच इतर खेळाडूंच्या उकृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या बळावर चेन्नईला 176 धावांवर रोखले. यावेळी चेन्नई संघाकडून रविंद्र जाडेजा आणि शिवम दुबे यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले.
रोहित-सुर्याची आक्रमक फलंदाजी –
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी 40 चेंडूत 63 धावांची भागादारी केली. रिकेल्टन 19 चेंडूत 24 धावा करून बाद झाल्यानंतर सुर्याकुमार यादव फलंदाजासाठी आली. दरम्यान, रोहित-सुर्याने आक्रमक फलंदाजी करत 54 चेंडूत 114 धावांची भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने 45 चेंडूत 76 तर सुर्याकुमार यादवने 30 चेंडूत 68 धावा करत 9 विकेट्सने मुंबईला विजयी केले. दरम्यान, मुंबईने तब्बल तीन वर्षांनंतर चेन्नईवर हा विजय मिळवला.
मुंबईविरोधातील पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीची प्रतिक्रिया –
चेन्नई सुपर किंग्स संघाची यंदाच्या आयपीएल सत्रात आतापर्यंत खराब कामगिरी राहिली असताना त्यांना मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर महेंद्रसिंग धोनी निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी संवाद साधताना म्हणाला की, आम्ही सामन्यात खराब कामगिरी केली. मैदानावर दव पडत असल्याने जिंकण्यासाठी अजून अतिरिक्त धावांची गरज होती. मात्र, जसप्रीत बूमराहने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी मुंबईच्या गोलंदाजीपुढे अधिकच्या धावा करता येणं शक्य झालं नाही.
दरम्यान, या वर्षी आम्ही प्लेऑफमध्ये आम्ही प्रवेश करून की नाही याबाबत माहिती नाही. पण या वर्षी प्लेऑफ मध्ये प्रवेश केला नाही तर संघातील त्रुटी दूर करून आयपीएलच्या पुढच्या 19 व्या सत्रासाठी संघ बांधणीकडे लक्ष देत सुरक्षित सुरक्षित प्लेइंग इलेव्हन मिळवणे महत्वाचे आहे.