जळगाव, 27 मे : खरीप हंगाम 2024 च्या पार्श्वभूमीवर बियाणे जास्त दरात विकले जात असल्याचे प्रकरण समोर येत होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा कृषी निवष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्ष व टोल फ्री नंबर चे शुभारंभ करण्यात आले.
सदर प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार व कृषी विभागाचे अधिकारी / कर्मचारी कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बियाणे उपलब्ध होत नसल्यास किंवा खते उपलब्ध होत असल्यास याबाबत कुठली तक्रार असल्यास खालील क्रमांकावर करावा संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- टोल फ्री क्रमांक 7498192221
- 0257-2239054
- 9834684620
वरीलपैकी कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर तक्रारग्रस्त सदर क्रमांक वर कॉल करावा त्या ठिकाणी कंट्रोल रुम तथा नियंत्रण कक्षातून आपणास मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच आपल्या समस्येबाबत संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना सूचना करण्यात येतील, असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सुरज जगताप यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका