मुंबई, 4 मार्च : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आज आमदार अबू आझमी यांनी माफी मागितली आहे. माझे शब्द चूकीचे अर्थ लावण्यात आले आहेत. आणि जर भावना दुखावल्या असतील तर आपले वक्तव्य मागे घेण्यास आणि माफी मागण्यास तयार असल्याचे आमदार आझमी यांनी सांगितले.
अबू आझमींची वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी –
अबू आझमी याबाबत म्हणाले की, माझे शब्द चूकीचे अर्थ लावण्यात आले असून इतिहासकार आणि लेखक औरंगजेब रहमतुल्ला अली यांच्याबद्दल जे म्हणतात तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतीही अनादरकारक टिप्पणी केलेली नाही. परंतु, तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द, माझे वक्तव्य मागे घेतो, असे आझमी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आमदार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख यांनी असेही म्हटले आहे की या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. दरम्यान, माझ्या वक्तव्याचे राजकारण केले जात असून मला वाटते की, यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान करत आहे.
आमदार अबू आझमींनी नेमकं काय म्हटलं होतं? –
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचा बचाव करणारे वक्तव्य केले होते. मी 17व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबला क्रूर, अत्याचारी किंवा असहिष्णु शासक मानत नाही. आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून मुघल सम्राटाची विकृत प्रतिमा निर्माण केली जात आहे. औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले होते.
आमदार अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सभागृहात अबू आझमींच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.