जळगाव, 6 ऑगस्ट : उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, उत्तर काशी दुर्घटनेत जळगाव शहरातील तीन भाविक अडकले होते. मात्र, आता हे सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित –
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. परंतु, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील Maount Bhagirathi Home Stay Harshil या स्टे हाऊसशी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला.
दरम्यान, सदर मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्या नगर जळगाव येथील आहेत. तसेच हे सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
सदर भाविकांचे वडील चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.
महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित –
उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यांतील 40 अशा 51 पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचना –
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांशी संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती –
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 0135-2710334 / 821