जळगाव, 5 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून रावेर आणि यावल तालुक्यातील शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी थेट जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना वीजतारा चोरीच्या घटना थांबवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
शेतशिवारातील वीजतारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ –
चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही कारवाई झाल्याचेही दिसून येत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. शेतातील वीज तारांची चोरी झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा खंडित होत असुन व तो सुरळीत करण्यासाठी त्यांना अनेक बाधा येत आहे. या चोरीच्या घटनांमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अमोल जावळे यांचे एसपींना पत्र –
शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असल्याने भाजपचे जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी थेट जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना वीजतारा चोरीच्या घटना थांबवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. वीजेच्या तारा चोरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून व पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठीची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत