नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी अविनाश पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यात महायुतीला कशा पद्धतीने विजय मिळाला, तसेच आगामी काळातील जळगाव जिल्ह्यातील विकास याबाबत भाष्य केले.