• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली ऑन फिल्ड पाहणी; पंचनामा ते ओला दुष्काळच्या मागणीवर CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठच सांगितलं

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 24, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली ऑन फिल्ड पाहणी; पंचनामा ते ओला दुष्काळच्या मागणीवर CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ठच सांगितलं

लातूर, 24 सप्टेंबर : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेतीपिके पाण्याखाली गेली असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाला देखील पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, पंचनाम, शेतकऱ्यांना मदत तसेच ओला दुष्काळ आदी मुद्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत बोलताना महत्वाची माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –

लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत म्हणाले की, राज्यात ज्या भागाच्या शेतीचे नुकसान झालंय त्या भागात सरसकट पद्धतीने शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. नुसतीच मदतच नाही तर टंचाईबाबतच्या जे काही अटी शर्ती आहेत अगदी त्याच अटी-शर्ती अतिवृष्टीला देखील लागू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.

मुख्यमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याबाबत महत्वाच्या सूचना –

राज्यातील अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली असल्याने पंचानामे करायला देखील अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशिर होऊ शकतो. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेवढे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत, त्यावर कार्यवाही सुरू केली आहे. ज्याठिकाणी पंचानामे करणे शक्य नाहीये; आपल्या भागात पाणी गेले तेवढेच रेकॉर्डला दिसले पाहिजे यासाठी त्याठिकाणी ड्रोन शूटिंग तसेच मोबाईलवरून फोटो काढले आणि प्रशासनास दिले तरी ते शासनास मान्य असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


दरम्यान, यंत्रणनेने देखील नियम व अटी शर्तीवर अडून न राहता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच ज्या शेती भागात जमिनी खरडून गेल्या आहेत त्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत ही वाढून मिळावी अशी मागणी केली जात आहे. म्हणून ती मदत शासनाकडून वाढवून दिली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दिवाळीपुर्वी सगळ्या शेतकऱ्यांना मदत –

आपत्ती व्यवस्थापनाचे नियमांमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्या असून त्याप्रमाणेच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वीच मदत केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले.  याआधी नुकसानीचे पंचनामे शासनाकडे आल्यानंतर सहा-सहा महिन्यांनी मदत दिली जायची. मात्र, यावेळेस ज्या-ज्या भागातील पंचनामे शासनास प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना मदत दिली जात आहे. राज्य शासनाच्यावतीने कालच 2200 कोटी रूपयांची मदत जाहीर केली असून दिवाळीपुर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


मुख्यमंत्री ओला दुष्काळबाबत काय म्हणाले? –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ म्हणजे ही बोलीभाषा आहे. दुष्काळाचे जी संकल्पना आहे त्यामध्ये ओला दुष्काळ अशाप्रकारची कुठलीही व्यवस्था नाही. साधारण दुष्काळाच्या काळात ज्या काही योजना तसेच सूट राबवितो. त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ सोडून सर्व योजना याठिकाणी राबविल्या जातील. त्यामध्ये सर्वात प्रमुख बाब ही विजेच्या बिल स्थगित केले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


मात्र, आता राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना वीजबील माफी करण्यात आली आहे. त्यामुळे वीजेचे बिल घेण्यात येणार नाही. दरम्यान, याव्यतिरिक्तही टंचाईच्यावेळी ज्या काही योजना आपण लागू करतो असा त्याचा अर्थ आपण घेऊ या आणि ते आम्ही करणार असल्याचे स्पष्ठीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.


हेही वाचा : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा; म्हणाले की, “सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdemage cropfarmers demandflood in maharastramarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page