सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) 6 सप्टेंबर : सतत नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनंगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे घडली. दरम्यान, या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे संपूर्ण घटना? –
स्वतःच्या शेतात कोळपणीचे काम करत असताना एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन जीवन यात्रा संपवली. ही घटना रविवार दि 3 सप्टेंबर सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास जरंडी शिवारात घडली. नारायण लोटण पाटील वय (42) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी तसेच दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.