चंद्रपूर, 4 मार्च : राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चंद्रपुरातून तिहेरी हत्याकांडाची हादरविणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलहातून पतीने चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून पतीने चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. अंबादास तलमले (वय 50 वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पत्नी अल्का तलमले (वय 40 वर्ष) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20 वर्ष), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20 वर्ष) अशी तिघांची नावे आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी गावात काल 3 मार्च रोजी घडली. याप्रकरणात अंबादासला पोलिसांनी अटक केली आहे.
तिहेरी हत्याकांडाची हादरवाणारी घटना –
गेल्या अनेक दिवसांपासून तलमले कुटुंबियातील पती अंबादासचे घरी कायम वाद होत असताना त्याना काल पहाटेच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असतांना अंबादासने घरातील कुऱ्हाडीने मुलींसह पत्नी हल्ला केला. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, संशयित आरोपी असलेल्या अंबादासला नागभीड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
हेही वाचा :धक्कादायक, नाशिकमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग, गुन्हा दाखल






