जळगाव, 3 फेब्रुवारी : ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशन या योजनेचा मुख्य हेतू आहे. जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सर्व कामे उत्तमरित्या पुर्ण करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याने जल जीवन मिशन अंतर्गत महत्वपुर्ण कामे करत 100% नळजोडणी पूर्ण करून राज्यात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील जलजीवन मिशनचा आढावा घेण्यात आला.जल जीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण कुटुंबांची नळजोडणी 100% पूर्ण झाली आहे. यात 6.91 लाख ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. महाराष्ट्राची एकूण नळजोडणी 88.13% आहे, त्यामुळे जळगाव राज्याच्या सरासरीच्या तुलनेत पुढे आहे.
जळगावने पाणी गुणवत्ता चाचणीमध्ये 98.66% गावांची तपासणी पूर्ण केली आहे, ज्यात जळगावचा राज्यात 6 वा क्रमांक आहे. तर जळगावने रासायनिक जल चाचणीमध्ये 92% गावे तपासली आहेत, पण धुळे (98.51%) पेक्षा 6.51% ने मागे आहे.राज्यात अजून काही जिल्ह्यांनी 95% पेक्षा अधिक चाचणी पूर्ण केली आहे. जळगावने 100% ग्रामीण नळजोडणी पूर्ण करून हे सर्वोच्च स्थान मिळवले आहे. यात केवळ ‘हर घर जल’ प्रमाणन आणि रासायनिक जल चाचणीमध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करत आहे. गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगावने ‘हर घर जल’ प्रमाणन मिळवणाऱ्या गावांची संख्या वाढवणे आणि रासायनिक जल चाचणीचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्याची गरज असून यापुढे त्यावर काम केले जाईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
हेही वाचा : Video : ‘….ते मध्यरात्री माझ्या भेटीला आले होते’; धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यासोबतच्या भेटीबाबत मनोज जरांगे यांचा गौप्यस्फोट