नागपूर, 1 फेब्रुवारी : राज्यात महायुती सराकारमध्ये पालकमंत्र्यांची नावे जाहीर झालेले असले तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत तिढा निर्माण झाला आहे. याठिकाणी नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना तर रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भूसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न दिल्याने तिढा निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्र्यांच्यावतीने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी स्थगिती दिली होती. अशातच नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री गिरीश महाजन आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मंत्री गिरीश महाजन नागपूरात आले होते. यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत माध्यमांसोबत बोलतना त्यांनी सांगितले की, , 2014 ते 2019 च्या काळात मी नाशिकचा पालकमंत्री तथा कुंभामेळा मंत्री होतो. याकाळात नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन पार पडले होते. आणि आता पुन्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आहे म्हणून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मुख्यमंत्र्यांसह माझा आग्रह होता. कुंभमेळ्याचे आयोजन व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी त्यामागची भूमिका होती.एकमत होऊन तिढा सुटेल –
यानंतर नाशिकचे पालकमंत्री पद जाहीर झाले होते. मात्र, महायुतीत तीनही पक्षांची नेते या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत हा नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ स्तरावर एकमत होऊन तिढा सुटेल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. यामुळे नाशिकच्या पालकमंत्री मिळण्याची मागणी –
ज्यावेळी 2022 मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आले त्यावेळीही नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तिढा होता. मात्र, मी देवेंद्रजींना सांगितले की, दादा भूसे यांना नाशिकचे पालकमंत्री करावे. मात्र, आता पुन्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आल्याने म्हणून नाशिकसाठी पालकमंत्री मिळण्याची मागणी आहे. गेल्यावेळी पालकमंत्री तसेच कुंभमेळा मंत्री असल्याने सुरक्षित तसेच स्वच्छ पद्धतीने हा कुंभमेळा पार पडला. यामुळे आता जर पुन्हा नाशिकचा पालकमंत्री राहिलो तर याचपद्धतीने आम्हाला कुंभमेळ्याचे नियोजन करण्यास सोईचे होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले आहेत.
हेही वाचा : GBS Jalgaon : जळगावात आढळली जीबीएसची पहिली रुग्ण, प्रकृती स्थिर