जळगाव, 8 मे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील शहरासह चोपडा, एरंडोल, भडगाव यांसह अनेक भागात अवकाळी पावासाने हजेरी लावली. यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून आज सकाळीच त्यांनी नुकसान पाहणीला सुरूवात केलीय.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा –
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रायलयीन बैठकीमुळे जिल्ह्याबाहेर होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आज सकाळीच पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी दौऱ्यास सुरूवात केलीय. यावेळी त्यांनी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शेतात जात नुकसानीची पाहणी करत संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील महत्वपुर्ण सूचना दिल्या.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, भडगाव तसेच चोपडा तालुक्यासह विविध भागात जोरदार अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. यामध्ये जनावारांच्या चाऱ्याचे तसेच केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबतच जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर प्रशासनाने तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे केल्या आणि वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत केला.
View this post on Instagram
पालकमंत्र्यांनी दिल्या तात्काळ पंचानामा करण्याच्या सूचना –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतली. वादळी पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरे दगावली असल्यास अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचा समावेश करून योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनास दिले. महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा : मुंबईत जळगावचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव