• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“ज्या ताटात खाल्लं त्या ताटात…”, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? VIDEO

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2023
in जळगाव जिल्हा, Uncategorized, खान्देश, महाराष्ट्र
“ज्या ताटात खाल्लं त्या ताटात…”, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? VIDEO

जळगाव, 16 जानेवारी : आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. कधीकधी गर्व फार नडतो, या शब्दात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलं. राज्यात जून महिन्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर अजूनही दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलंय.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –

“जे करायचं ते बिंधासपणे करायचे. आपण काय बघोडे नव्हतो. आपण तर जाऊन सांगून आलो होतो. असं नाही की गपचूप पळून गेलो. आधी साहेबांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की, जे घडतंय, ते दुरुस्त करुन घ्या. 40 आमदारांपैकी मी 33 वा होतो. माझ्याआधी 32 जण चालले गेले होते. पण मी तिकडे न जाता आधी उद्धव ठाकरेंना सांगायला गेलो आणि तिथे सांगितलं की, हे दुरुस्त करायला हवं.”

“अजित दादांनी पण सकाळी शपथ घेतली होती. पण त्यांना हे दुरुस्त करुन संध्याकाळपर्यंत परत आणता आलं. हा प्रयत्न जर कदाचित आमच्या नेत्यांनी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. आपचे 13 आमदार दिल्लीमध्ये गायब झाले होते. तर केजरीवाल यांनी परत आणले की नाही. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांच्या मुलाचे 6 आमदार गायब झाले होते. ते परत आणले की नाही. हे पण आणू शकले असते. पण कधीकधी ग (गर्व) फार फार नडतो”, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हेही वाचा – खान्देशपुत्राचा सन्मान! खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड, वाचा सविस्तर?

ज्या ताटात खाल्लं त्या ताटात… –

तसेच ते पुढे म्हणाले की, भाडेकरू माणूस सुद्धा आपल्या घरात राहिला तर त्याला आपुलकी होऊन जाते. मी 35 वर्ष एकाच घरात राहिल्यामुळे इच्छा होत नाही जास्त बोलायची. कारण शेवटी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात वाईट करायची ही आमची संस्कृती नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते मी वेळ आल्यावर बोलेन असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patil in jalgaonjalgaon gulabrao patil newsjalgaon politicsminister gulabrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page