जळगाव, 5 जानेवारी : तुम्ही आता सुधारले नाही तर तुमचा नशिराबादचा टोलनाकाच बंद करीन. आता शेवटचे सांगतोय; अन्यथा टोल बंदच करेल, असा आक्रमक शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी एनएएचआयच्या (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अधिकाऱ्यांना सुनवाले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’ची शनिवारी येथील जिल्हा नियोजन भवनात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
‘दिशा’च्या बैठकीत नेमकं काय घडलं? –
महामार्गावरच्या गैरसोयींमुळे सातत्याने अपघातांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सातत्याने तक्रारी करुनही NHAI च्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. त्यावर NHAI चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना मंत्री संजय सावकारे यांनी धारेवर धरत नहीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दिशा’च्या बैठकीनंतर मंत्री संजय सावकारे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राष्ट्रीय महामार्गवर जे काही कामे झाली आहेत..त्याबाबत काही कामे अपुर्ण राहिलेली आहेत. त्याबाबचा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. मागे जिल्हाधिकाऱ्यांसोबत याविषयी दोन वेळा बैठक झाली. रक्षाताई तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केली. मात्र, आतापर्यंत त्यांनी एकही विषय सोडवला नाही. मग टोला कसा घेता?, असा प्रश्न मंत्री सावकारे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, त्यांचा रस्ता तयार झाला आणि त्यांनी टोल वसुलीला सुरूवात करून टाकली. पण त्या रोडमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत..त्या समस्या त्यांनी सोडवणे अपेक्षित आहे. आणि त्या समस्या जर संबंधित अधिकाऱ्यांनी सोडविल्या नाही तर आम्ही टोल बंद करु असा इशारा दिला असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती –
या बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केझो, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राजू लोखंडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive