अहमदनगर, 12 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात नोकरीला असलेल्या नवदाम्पत्याने संगमनेर तालुक्यातील साकुर या आपल्या मूळ गावी येत गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला अवघे अडीच – तीन महिने झाले होते. दरम्यान, त्यांचे झाडाला गळफास घेतलेले मृतदेह आढळून आल्याने हा आत्महत्येचा प्रकार असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वैभव दत्तात्रय आमले (वय 23 वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय 20 वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नव दाम्पत्याचे नावे आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आणि स्नेहा आमले हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वीच ते दोघेही संगमनेरमधील आपल्या गावी परतले होते. त्यानंतर या दोघांनी एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (11 ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले होते. झाडाला लटकणारे या दाम्पत्याचे मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांकडून तपास सुरू –
पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली किंवा इतर काही कारण आहे काय या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. याचा तपास केला जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुर्दैवी अंत झाल्याने साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत