नवी दिल्ली, 12 मे : भारत-पाकमध्ये सध्या शस्त्रसंधी लागू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. एअर स्ट्राईकनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला करणार संबोधित –
पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. यामध्ये भारतानं दहतवाद्यांसह पाकिस्तान चांगलाच धडा शिकवला. यांतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय. असे असताना आज गेल्या 17 दिवसांत भारतानं नेमक्या कशापद्धतीने कारवाया केल्यात यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय तसेच भारताच्या तीन सैन्य दलांकडून पत्रकार परिषदेद्वारे माहिती देण्यात आली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी एअर स्ट्राईकनंतर कुठलेही अधिकृत स्टेटमेंट दिले नव्हते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नेमकं काय बोलणार? –
अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवार 11 मे दुपारपासून सीमारेषेवर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे, दोन्ही देशातील सैन्य कारवायांना ब्रेक मिळाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना नेमकं काय बोलतील, भारत-पाक युद्धाबाबत काय माहिती देतील याची उत्सुकता भारत-पाकिस्तान यांच्यातील नागरिकांसह जगभरातील देशांना लागली आहे.