हैदराबाद – मनोरंजन जगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दक्षिण भारत चित्रपटांमधील सुपरस्टार अल्लु अर्जुन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संध्या थिएटर बोहर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आज शुक्रवारी अल्लु अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले.
काय आहे नेमकं प्रकरण –
अल्लू अर्जुन उपस्थित असलेल्या प्रीमियर शोदरम्यान संध्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध कलम 105 (हत्येची रक्कम नसून अपराधी हत्या), 118(1) (स्वेच्छेने दुखापत करणे) r/w 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अल्लू अर्जुननं 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियर शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या संदर्भात हैदराबाद पोलिसांनी दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यात आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल आणि हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं आहे.
मृत महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून 5 डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुनच्या अगोदर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नाही.
रेवती (35) आणि तिचा मुलगा श्री तेज (13) यांना मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीमुळे चिरडले गेल्यानं दुदमरले होते. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना बाहेर काढले आणि तिच्या मुलाचा सीपीआर केला आणि दोघांना तात्काळ दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात हलवले. दुर्गाबाई देशमुख रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, ती महिला मृत झाली असून मुलगा श्रीतेज याला चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आलं आहे.
25 लाखांची मदत जाहीर –
अल्लू अर्जुनने 6 डिसेंबर रोजी मृताच्या कुटुंबासाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती आणि घडलेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली होती. मृत महिलेच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करण्याचं आणि मुलाचा रुग्णालय खर्च उचलण्याचं आश्वासनंही त्यानं दिलं होतं.