नागपूर – बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची अन्यायकारक तुरुंगवासातून मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेथील बांग्लादेश सरकारकडे केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी काय म्हटले –
बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्यांकांवर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा निषेध करतो.
सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी केवळ मूक प्रेक्षक बनले आहेत. बळजबरीने बांगलादेशातील हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व सुरू होत असल्याचे दिसत आहे. अशाच शांततापूर्ण आंदोलनात हिंदूंचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात पाठवणे बांग्लादेश सरकारने अन्यायकारक आहे.
भारत सरकारला आवाहन –
बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलावीत, असे आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत सरकारला केले आहे.
या महत्त्वाच्या वेळी भारत आणि जागतिक समुदाय आणि संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन व्यक्त केले पाहिजे आणि जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी आपापल्या सरकारांकडून शक्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले.
धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांना जामीन नाकारला –
बांग्लादेशात सरकारी वकील सैफूल इस्लाम यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेनंतर त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. यानंतर अल्पसंख्याक समुदाय आक्रमक झाला. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात वकील सैफूल इस्लाम ठार झाले होते. अटक करण्यात आलेल्यांत बहुतांश अल्पसंख्याक स्वच्छता कर्मचारी आहेत. या प्रकरणात 46 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा – डिसेंबर महिन्यात सुट्याच-सुट्या; महाराष्ट्रात किती दिवस बँक बंद असणार? वाचा, एका क्लिकवर