अंधेरी (मुंबई) 23 जानेवारी : महापालिका निवडणुकांबाबत मी सर्वांसोबत बोलतोय. सर्वांचे एकच मत आहे की एकटे लढा. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची तयारी आणि जिद्द बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून आधी बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झालीये तर मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. ते शिवसेना मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान, यावेळेला मला सूड उगवून पाहिजे. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो. जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो. तो गद्दार आणि गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये आणि जर तुम्ही सर्व शपथ घेऊन सांगत असाल तर मी जेव्हा वेळ येईल तेव्हा एकटा लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणूका लढण्याबाबत त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
शिवसेना मेळाव्याचे आयोजन –
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका –
आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है?” असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. जेवढे अंगावर याल तेवढे वळ अंगावर घेऊन दिल्लीला जाल. मराठी माणसाच्या नादाला लागू नका, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याबाबत टीका –
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज उपनगरात आपण सभा घेत आहोत. सध्या अडचणीची जागा आहे. मात्र, वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरु आहे, आपली सभा झाल्यानंतर ते चिरकतील आणि तुम्ही महाराष्ट्रच्या अस्मितेचा वध हे गद्दार करत आहेत. गद्दारांना जिंकवणारे अमित शाह असून महापालिका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट होते बघा. दरम्यान, आता बसायचा तर बसा नाही तर घरी निघून जा. रुसू बाई रुसू कोपऱ्यात जाऊन बसू आणि गावात जाऊन बसू डोळ्यातले अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसताय. आपण गाफिल राहिलो त्याचा फायदा त्यांनी घेतला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…