• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करताये”, रामदेववाडी अपघातप्रकरणावरून उन्मेश पाटील यांचा नेमका कुणावर आरोप?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करताये”, रामदेववाडी अपघातप्रकरणावरून उन्मेश पाटील यांचा नेमका कुणावर आरोप?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 17 मे : रामदेववाडी अपघात प्रकरणी वेळीच जर प्रशासाने कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले असते. लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करत असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केला. जळगावात ते माध्यमांसोबत बोलत होते.

रामदेववाडी अपघातावर काय म्हणाले? –
गेल्या काही दिवसांपुर्वी रामदेववाडी येथे भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत न्याय मिळण्याच्या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला. यावर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, आम्ही त्याठिकाणी गावातील नागरिकांसोबत संवाद साधला. अपघातात दोषी असलेल्यांना हे संरक्षण देत आहेत. गोरगरीबांवर अन्याय करण्याचे काम ते करत आहेत. दोषींना मुंबईला पाठवण्यात यांचा हात आहे. याचा अर्थ गरिबांना न्याय नाही का? या मंत्र्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता लगावला.

लोकशाहीचा खून करण्याचे काम –
रामदेववाडी अपघात प्रकरणात पोलिस यंत्रणेवर दबाव आहे. मात्र, पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता याप्रकरणात जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही उन्मेश पाटील यांनी सांगितले. वेळीच जर प्रशासाने कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले असते. लोकशाहीचा खून करण्याचे काम हे मंत्री करत असल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला.

रामदेववाडी अपघात प्रकरण –
जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला होता. या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर मृत महिलेच्या भाचा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या तरूणाचा देखील रात्री उशिराने मृत्यू झाला. या अपघातप्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामदेववाडीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला.

हेही वाचा : “शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संचालकांना गिरीश महाजन यांचे पाठबळ”, जिल्हा बँकेच्या मुद्यावरून उन्मेश पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister girish mahajanramdevadi accident caseunmesh patil allegationunmesh patil allegation on girish mahajan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page