नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू असल्याने उत्तर भारतातील बहुंताश प्रमुख स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत तब्बल 18 जणांचा मृत्यू झालाय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील पलाटवर काल रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास मोठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. यात 18 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात आलीय.नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्याने स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन लहान मुले आणि 10 महिलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आलीय. दरम्यान, घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.कुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी –
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे देशातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे. आणि या स्टेशनवर दररोज पाच लाखांहून अधिक लोक या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. असे असताना नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या काल शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आल्याने आणि चेंगराचेंगरी झाली.
यावेळी रेल्वे अधिकारी किंवा आरपीएफ अधिकाऱ्यांनाही देखील गर्दीचा अंदाज घेता आलेला नाही. यामुळे गर्दीवर लक्ष ठेवण्यात रेल्वे अधिकाऱ्यांनाही अपयश आल्याचे सांगितले जात आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत