• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“विधानसभा निवडणुकीचा निकाल हा….”, निकालबाबत वैशाली सुर्यवंशी यांची प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
“विधानसभा निवडणुकीचा निकाल हा….”, निकालबाबत वैशाली सुर्यवंशी यांची प्रतिक्रिया

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 25 नोव्हेंबर : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांचा विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून पराभव झाला. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत विधानसभेच्या निकालबाबत भाष्य केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनमताचा विश्वासघात तर आहेच. पण ईव्हीमचा विजय झाला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत आणि यात तिळमात्र शंका नसल्याचे वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या.

काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी? –
वैशाली सुर्यवंशी पत्रकार परिषदेत संवाद साधताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीचा जळगाव जिल्ह्याचा निकाल समोर आला आहे. महाराष्ट्रात देखील हा जो काही निकाल लागला आहे. त्यावरून लोकसभेचा निकाल आणि विधानभेचा निकाल यामध्ये तुलना केली तर विधानसभेचा निकाल हा न पटणारा आहे. लोकशाहीचा खून आहे की काय?, अशापद्धतीचा हा निकाल लागलेला आहे.

एकीकडे आपण बघतो या देशात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही…बेरोजगाराची मुद्दा आहे. आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत. महागाई गगनाला भिडलेली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येत नाही. हे हास्यस्पद आहे. ज्यापद्धतीची मतांची आघाडी आहे…ते आपण स्वप्न बघतो की काय, अशापद्धतीचे राज्यासह देशाला हादरवणारे निकाल लागले आहे, असे मत निकालाबाबत वैशाली सुर्यंवंशी यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असताना पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत ज्यापद्धतीचे लीड वाढत होते. ते तर संशयास्पद आहे. खरंतर, हा ईव्हीएमचा अतिरेक आहे. अशापद्धतीचे निकाल हे जनतेची फसवणूक असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजेत. आणि बॅलेट पेपरवरचे आव्हान प्रत्येकाने स्विकारले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ठ केले.

हेही वाचा : ‘आमचे आप्पा मंत्री व्हावेत,’ कुरंगी-बांबरूड गटातील शिवसैनिकांचे तुळजाभवानी मातेला साकडे 

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newsShivsena UBTsuvarna khandesh livevaishali suryavanshividhansabha election 2024 results

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page